केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात आज रत्नागिरी येथे काढण्यात आला भव्य मोर्चा—
👉लोकशाही मार्गाने दिल्ली येथील जंतरमंतर वर न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या पोलीसांनी लाठीमार करुन शेकडो विद्यार्थींना जखमी केले त्याचा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी आज रत्नागिरी येथे शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच या सामाजिक संघटनेच्या वतीने मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला..
या मोर्चात रत्नागिरी शहर ग्रामीण भागातील विविध राजकीय, सामाजिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
