रत्नागिरीमुंबई जयगड ते सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग दरम्यान चालणाऱ्या एम.टु एम या अत्याधुनिक फेरी...

मुंबई जयगड ते सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग दरम्यान चालणाऱ्या एम.टु एम या अत्याधुनिक फेरी बोटीची चाचणी यशस्वी झाली असल्याने आता सदरची नियमित सेवा 15 सप्टेंबर पासून सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत

मंगळवारी ही बोट मुंबईच्या भाऊंचा धक्का येथून सकाळी निघाली आणि दुपारी रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरात दाखल झाली.त्या नंतर ही बोट पुढे जयगड कडे रवाना झाली..सदरची चाचणी यशस्वी झाली असल्याचे सांगितले गेले असले तरी त्याची अधिकृत घोषणा कधी केली जाईल याकडे कोकणवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.तब्बल 35 वर्षानंतर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग बोट सेवा सुरू होत असल्याने कोकणवासीयात आनंदाचे वातावरण पसरले आहे

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...