रत्नागिरीत शहरा लगत असलेल्या बाणेवाडी शिरगाव येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराचा वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंगलमयी प्रसंगी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि शुभाशीर्वाद प्राप्त केले.
मंदिराचे व्यवस्थापक श्री. दिनेश जोशी यांनी मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते.
