“ जनता दरबार म्हणजे जनतेच्या समस्यांना थेट न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पालकमंत्री श्री. उदय सामंत नेहमीच जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहिले आहेत.
शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडविले जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
