आज ज्या प्रकारचा नरवणमधे पूर आला तो पूर्णपणे मानव निर्मित होता. एका पावसात एवढं पाणी येण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. ८० वयाचे वृद्ध जोडपे विश्राम आजोबा आणि सावित्री आजी पऱ्याचे पाणी घरात घुसले तर काय करायचे या चिंतेत होते.
ह्या पुराबद्दल पूर्वसूचना ग्राम पंचायतीला देण्यात आली होती. MSEB ची अंडरग्राऊंड पाईपलाईन आजूबाजूच्या कातळ, डोंगर, नाले यांचा विचार न करता करण्यात आली होती. वादळ नियंत्रणासाठी आलेला UNDP चा फंड आजूबाजूच्या परिसंस्थेचा विचार न करता करण्यात आला. त्यामुळे कातळाचे पाणी वाहून गावात घुसले. फोन केलेला असता PWD ने (सार्वजनिक बांधकाम विभाग) आमची परवानगी घेतलेली नाही असे कळले होते. असं असता ही पाईपलाईन आणि Airtel आणि जिओची पाईपलाईन घाईघाईत का टाकली हा प्रमुख प्रश्न आहे.
यावर ग्राम पंचायत उत्तर देणं आणि आपली बाजू मांडणं गरजेचं आहे.
नरवणचा मेन रोडवर डोंगरातले दगड येऊन पडले आहे. गावात अनेक ठिकाणी रस्ता होरलाय. अनेक लोकांच्या घरी पाणी भरले आहे. हे नरवण मधे कधीच झालेले नाही. अक्ख्या नरवणच्या डोंगराचे पाणी खाली आलेलं असताना इंजिनीर मुळात याला परवानगी देतात कसे हे ही प्रश्न उपस्थित होतात. गुडगाभर माती आणि चिखल रस्त्यात आणि बाजारपेठेत राहणाऱ्या लोकांच्या घरात आले आहे.
अनेक ठिकाणी गावात जंगलतोड झाली त्याची माहिती ग्राम पंचायतीला होती का? झाडं माती धरून ठेवतात. जंगलतोड झाल्यावर माती धरून ठेवायला काही नाही हे समजणे कठीण काम नाही. असे असता एक बंधारा वाहून गेला आहे. त्यात करदाता सामान्य नागरिकांच्या किती पैश्याचे नुकसान झाले हे माहित नसता आता नवीन दोन तीन बंधारे बांधण्यात येणारेत. ह्याचेही पुन्हा सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.
आता यावर पुन्हा टेंडर आणि पुन्हा पैश्याची उधळण हा उपाय नाही. गावाने एकी दाखवून यावर लवकरात लवकर तोडगा काढून घेणे गरजेचे आहे. यासाठी ग्राम पंचायतीला अर्ज पाठवणे गरजेचे आहे. याशिवाय हे काम होईल असे दिसत नाही. नागरिक म्हणून ग्रामस्थ जागरूक होणे गरजेचे आहे. चुका दाखवून देणं गरजेचं आहे. तरंच बदल घडेल.
-आशुतोष जोशी