१. सुर्योदयापूर्वी व सुर्यास्तानतंर पक्षी काहीही खात नाहीत..
२. पक्षी रात्रीअपरात्री विनाकारण फिरत नाहीत..
३. आपल्या पिलांना स्वतः उडण्याचे , आपला चारापाणी व्यवस्थापन याचे प्रशिक्षण देतात,
४. अधाशासारखे कधी खात नाहीत. तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, थोडे खाऊन उडून जातात..
५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पहाटे लवकर उठून, आनंदाने चिवचिवाट करत आनंदाने गाणी गात उठतात.
६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत..
७ ) अभक्ष्य भक्षण करत नाहीत.
८) आपल्या प्रजातीतच सोबती एकत्र राहतात . बदक आणि हंसाची अशी जोडी कधीच होत नाही..
९) सतत क्रियाशील राहतात, रात्रीशिवाय विश्रांती घेत नाहीत..
१० ) आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.
११ ) आपल्या पिल्लांवर खूप प्रेम करत योग्य काळजी घेतात..
१२). सर्व पक्षी आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात..
१३) .सर्वच पक्षी निसर्ग नियमांचे शांतपणे पालन करतात.
१४ ) . आपलं घरटी पर्यावरणपुरक निसर्गाची मोडतोड न करता बांधतात .
१५ ) . पिल्ल स्वतः पोटभरण्या इतके मोठी झाली की त्यांच्या आयुष्यात लूडबूड करीत नाहीत..
१६) त्यांना त्यांच्या पायावर –पंखांवर उभे राहून मोठे होण्यासाठी दिशा दाखवतात
- पक्षाकडून आपण काही शिकणार आहोत का ?
बालकवी म्हणतात ,
” केव्हा मारूनि उंच भरारी
नभात जातो हा दूरवरी
आनंदाची सृष्टी सारी,
आनंदे भरती “
अँड विलास पाटणे ( आधारीत )
