पर्यटन स्थळ विकास योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील थिबा पॅलेस राजमाता जिजामाता उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकसित करण्याच्या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते अत्यंत अभिमानाने आणि जल्लोषात पार पडले.
यावेळी छावा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच दीड वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा रत्नागिरीत उभा करण्यात यश आले. सुमारे 3000 चौरस फूट जागेत आणि दोन कोटी रुपयांच्या खर्चातून साकारलेला हा प्रकल्प छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती, दृकश्राव्य माध्यमे, कलादालन आणि विविध शौर्यगाथांचा समावेश करणारा आहे. या प्रकल्पाचा उद्देश पर्यटक, अभ्यासक आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना महाराजांचे पराक्रम, कर्तृत्व आणि जीवनकार्य समजून घेता यावे आणि त्यातून प्रेरणा मिळावी हा आहे, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शिवसेना नेते मा. राजेंद्रजी महाडिक, उपजिल्हाप्रमुख राजन शेटे, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, महिला शहर संघटक स्मितलताई पावसकर, उपशहरप्रमुख विजय खेडेकर, विभागप्रमुख संजय हळदणकर, युवासेना शहर समन्वयक प्रथमेश साळवी, उद्योजक सचिन लांजेकर, भाजपचे सचिन वहाळकर, विरेंद्र वणजू, शैलेश नार्वेकर, सौ. दिशा साळवी, बाबा नागवेकर तसेच रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. वैभव गारवे यांसह रत्नागिरीकर उपस्थित होते.