महाराष्ट्रपुणे जिल्ह्यातील श्री.क्षेत्र ओतूर येथे जगद्गुरु संत श्री.तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या...

पुणे जिल्ह्यातील श्री.क्षेत्र ओतूर येथे जगद्गुरु संत श्री.तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील श्री.क्षेत्र ओतूर येथे जगद्गुरु संत श्री.तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते.

या त्रिवेणी संगमात पोहोचताना मन अगदी प्रसन्न झालं. हा क्षण माझ्या आयुष्यात अतिशय भावनिक व ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा होता, असे यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी म्हटले.

तुकाराम महाराजांच्या गाथेचं संग्राह्य रूप नव्या पिढीसाठी नव्या माध्यमात उपलब्ध करून द्यावे म्हणून गाथेच्या छपाईसाठी ४८ तासांत १ कोटी रुपयांचा निधी संस्थानच्या नावावर जमा करणार असल्याचे ना. उदय सामंत ह्यांनी यावेळी सांगितले. तसेच गाथा ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून, परदेशातील मराठी आणि अनिवासी भारतीय वाचकांपर्यंतही तुकाराम महाराजांचे अभंग पोहोचवणार असल्याची घोषणा यावेळी मा. उदय सामंत ह्यांनी केली. ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा या संत साहित्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवता आला असेही यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी प्रतिपादन केले.

वारकरी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती त्यांच्या श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि परंपरेचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना वारीतील सर्व दिंड्यांना निधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. वारकऱ्यांच्या सन्मानासाठी ते नेहमी कटिबद्ध राहतात. वारकरी म्हणजे महाराष्ट्राची खरी संस्कृती. त्यांच्या सामाजिक, आर्थिक गरजांबाबत सरकार संवेदनशील असून मी स्वतः या विषयांवर कॅबिनेटमध्ये चर्चा घडवून आणणार असल्याचे आश्वासन ना. उदय सामंत ह्यांनी यावेळी दिले.

आपण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीसाठी जपतो आहोत. यासाठी माझ्या मतदारसंघात संत ज्ञानेश्वर माऊलींची सर्वात उंच मूर्ती, छत्रपती संभाजीराजांचा भव्य पुतळा हे स्मारकं उभारून महाराष्ट्राच्या अभिमानाचा वारसा उभा केला आहे. या सर्व उपक्रमांत महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उद्योग मंत्री म्हणून मी स्वतः आपल्या सोबत उभे आहोत असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी सर्व वारकऱ्यांना दिला.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने वारकरी संप्रदाय, मराठी भाषा आणि संत परंपरेचं संवर्धन अधिक जोमाने होईल, असा विश्वास वाटतो. आपण सर्वजण वारकरी परंपरेच्या आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत अशी ग्वाही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली.

यावेळी सहकारी आमदार शरददादा सोनवणे, वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळी, वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News