प्रभाग क्र. १ मधील आयरेवाडी ते अशोकनगर येथील हायवेलगत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी संबंधित इंजिनिअर व स्थानिक नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर चर्चा केली. यावेळी पाणी घरांमध्ये शिरू नये यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या
प्रभाग क्र. १ मधील आयरेवाडी ते अशोकनगर येथील हायवेलगत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे
