जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.याच पार्श्वभूमीवर सैनिकांचे मनोबल वाढविण्या साठी देशभरात नागरिकांनी तिरंगा रॅली व सिंदुर रॅली चे आयोजन करुन आपला पाठिंबा दर्शविला.. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात होते. या रॅलीचे आयोजन महिला शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील यांनी केले. कार्यक्रमात महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांनी मार्गदर्शन केले, तर अध्यक्षस्थानी सौ. वर्षा ढेकणे होत्या.
या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा आणि सिंदूर लावलेली शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. रॅलीतून महिला शक्तीचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून, रत्नागिरी शहरात भाजप महिला मोर्चा सशक्तपणे कार्यरत असल्याचे या रॅलीतून दिसून आले… महिलांनी भारत माता की जय.वंदे मातरम् च्या घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला