भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरीच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ मध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिक व महिलांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी लाभ घेतला. छत्री वाटप करताना सौ. वर्षा ढेकणे यांनी सांगितले की, “भारतीय जनता पार्टी केवळ निवडणुकांपुरती नाही तर वर्षभर समाजाच्या सेवा आणि गरजांसाठी सक्रिय असते. महिलांच्या हितासाठी व गरजांसाठी भाजप महिला मोर्चा नेहमीच पुढे राहील.”
या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून छत्री वाटप उपक्रमाचे अनावरण भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपच्या समाजसेवा कार्याची माहिती दिली व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत प्रशांत डिंगणकर शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, तसेच विक्रम जैन, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, अमित विलणकर, नितीन जाधव, गुरुप्रसाद फाटक, ज्ञानेश पोतकर सौ मनाली राणे भास्कर सुतार सर प्रतीक देसाई संतोष सावंत तुषार देसाई, सचिन गांधी, बबलू विलणकर, वैभवी शिवलकर, मुकुंद विलणकर, समीर वस्ता, प्रणाली रायकर, शैलू बेर्डे, प्रवीण रायकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, मंदार खांडकर सानिका शर्मा, अमेय घुडे, कमलाकर जोशी आदी भाजपचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत भाजपच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले