रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे गरजले .
पावसाच्या नुकसानीसह खातेनिहाय कामांचा घेतला आढावा
रस्ते, शाळा, आरोग्य, रेल्वेसह जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याच्या केल्या सूचना
रत्नागिरी – विशेष प्रतिनिधी
*मुंबई गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे, चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही अशा कडक *शब्दात माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी*
*जिल्हाधिकाऱ्यांसह संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत
खासदार. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, कोकण रेल्वेचे शैलेश बापट आदी मान्यवर उपस्थित होते
पहिल्या पावसातच लांजा येथील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा बोजवारा उडाला होता नागरिक आणि वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला या बैठकीत खासदार राणे यांनी महामार्गाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली योग्य वेळेत काम करता येत नसेल तर त्यांचा ठेका रद्द करा काम होण्यासाठी अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठेकेदार काय काम करतोय याची खात्री करा सात जून पर्यंत काम पूर्ण होईल अशाप्रकारे नियोजन करा असे स्पष्ट निर्देश दिले
या बैठकीत सर्व विभागांचा विस्तृत आढावा घेत खा. राणे यांनी संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांना नैसर्गिक आपत्ती काळात आपापल्या विभागांबाबत सतर्क राहून आपत्ती ओढवणार नाही आणि ओढावलीच तर त्यातून तात्काळ उपाययोजना कशी करता येईल याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. नैसर्गिक आपत्ती काळात प्रशासनाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे. तसेच मान्सूनपूर्व सर्व कामे पूर्ण करावी, शाळा सुरू होण्यापूर्वी त्या सर्व शाळांची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याबाबत आदेश देतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करून योग्य ती खबरदारी घ्यावी, या पावसाळ्यात छप्पर गळतीमुळे शाळा बंद अशी माहिती किंवा बातमी येत काम नये असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाने साथींचे आजार लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा योग्य पुरवठा करताना डॉक्टरांच्या नियुक्त्या करून साथीचे आजार पसरणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. तर खासदार नारायण. राणे यांनी कोकण रेल्वेने केलेल्या आपत्ती काळातील उपाययोजनांची माहिती घेताना त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे नवीन थांबे, नवे स्थानक याबाबत काय प्रस्ताव आहेत ते आपल्याला सादर करावेत अशा सूचना यावेळी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात किती नुकसान झाले, जीवित हानी किती झाली, शासकीय मदत किती जणांपर्यंत पोहोचली, ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाही त्यांना ती लवकरात लवकर पोहोचवा असे निर्देश दिले