महाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाला वरुन काँग्रेस नेते राहुल गांधी व निवडणूक आयोग...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाला वरुन काँग्रेस नेते राहुल गांधी व निवडणूक आयोग समोरासमोर…. तेव्हाच आम्ही उत्तर देऊ. राहुल गांधींच्या महाराष्ट्र निवडणुकी वरील आरोपांवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण!

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्राकार झाल्याचा आरोप केला आहे. यासह राहुल गांधी यांनी आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे असे आवाहन केले होते. यानंतर आता, निवडणूक आयोगातील सूत्रांनी रविवारी सांगितले की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आतापर्यंत त्यांना याबाबत अधिकृत पत्र लिहिलेले नाही किंवा भेटीची विनंती केली नाही. त्यामुळे ते जेव्हा भेटीला येतील तेव्हा निवडणूक आयोग उत्तर देईल. याबाबत द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

शनिवारी द इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या एका लेखात, राहुल गांधी म्हणाले होते की, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील एकूण मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांनी आरोप केला की, अतिरिक्त मतदारांपैकी बहुतेक ८५ मतदारसंघांमध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली नव्हती. त्यांनी महाराष्ट्र निवडणुकीत “मॅच-फिक्सिंग” केल्याचाही दावाही राहुल गांधींनी केला होता. याला उत्तर देताना निवडणूक आयोगाने एका पत्रातून शनिवारी आरोपांचे खंडन केले होते.

यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाचा गंभीर प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा योग्य मार्ग नाही. हे एक टाळाटाळ करणारे विधान आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे की, जर त्यांच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल तर त्यांनी त्यांचे दावे सिद्ध करावेत आणि लेखातील प्रश्नांची उत्तरे पुराव्यांसह द्यावीत.

राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे तुम्ही स्वाक्षरी नसलेल्या आणि माहिती देण्याची टाळाटाळ करणाऱ्या पत्रकांचे माध्यमांमार्फत वितरण करणे, हा गंभीर प्रश्नांना उत्तर देण्याचा योग्य मार्ग नाही. आपल्याला काहीही लपवायचे नसेल, तर माझ्या लेखातील प्रश्नांची थेट उत्तरे द्या. यासोबतच, लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी एकत्रित, डिजिटल आणि मशीन-रिडेबल मतदार यादी प्रकाशित करा. तसेच, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्रांवरील संध्याकाळी ५ नंतरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा. टाळाटाळ केल्याने विश्वासार्हता टिकून राहणार नाही. सत्य सांगितल्यानेच ती दृढ होईल.”
*

Breaking News

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस15 जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस धावणार….

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या...

🌾गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलीजगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांची भेट

▪️देहदान उपक्रमाचे केले कौतुक पणजी, दि. १२: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ....