रत्नागिरीमुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाट्ये समुद्र किनाऱ्यावर राबवली स्वच्छता मोहीम.किनारा केला चकाचक....

मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाट्ये समुद्र किनाऱ्यावर राबवली स्वच्छता मोहीम.किनारा केला चकाचक. पर्यटकांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाट्ये समुद्र किनाऱ्यावर राबवली स्वच्छता मोहीम.किनारा केला चकाचक. पर्यटकांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन–
👉 मुकुल महा विद्यालयाच्या मुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाब्रीया यांनी नेहमीच चांगले शिक्षण आणि स्वच्छतेवर भर देण्याचे सांगितले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थी आपला परिसर तर नेहमीच स्वच्छ ठेवतात आणि इतर ठिकाणीही स्वच्छता अभियाना मध्ये सहभागी होतात असे दिसून आले आहे


👉”मानवसेवा हीच ईश्वरसेवा” या आमच्या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम म्हणून मुकुल माधव विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभाग घेतला.

या उपक्रमात एकूण ५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेची भावना प्रत्यक्ष कृतीतून जोपासली. निसर्गाच्या संरक्षणासाठी केलेला प्रत्येक छोटासा प्रयत्नही स्वच्छ, निरोगी आणि सुंदर पर्यावरणाच्या निर्मितीत मोलाचे योगदान देतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना या अनुभवातून झाली.

या उपक्रमासाठी खालील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले
श्री. आशिष शिंदे वर्गशिक्षक, इयत्ता १० वी
कु. श्रुती गंगावणे मॅडम देश अपनायेन प्रभारी
श्री. वरद गोरे – मुकुल माधव फाउंडेशन

अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि जबाबदार नागरिकत्वाची मूल्ये रुजविण्याचा आमचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे असे मत प्राचार्य डॉक्टर रोहित देशपांडे यांनी व्यक्त केले

Breaking News