रत्नागिरी जिल्ह्यात सायकलिंगची चळवळ रुजवण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या व पाचशेहून अधिक बाल सायकलिस्ट सहभागी झालेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित किड्स सायक्लोथॉनच्या पूर्वसंध्येला ‘सायकल गौरव’, ‘सायकल कुटुंब गौरव’ आणि ‘सायकल योगदान सन्मान’ या पुरस्कारांचे वितरण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
कोकणाच्या इतिहासात पाचशेहून अधिक सायकलिस्ट सहभागी झालेली ही पहिलीच सायक्लोथॉन आहे —ही केवळ संख्या नाही, तर एका वाढत्या चळवळीची सुरुवात आहे असे मनोगत यावेळी उपस्थितांशी बोलतांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला खेडचे विनायक वैद्य, भागीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर, नगराध्यक्षा शिल्पाताई सुरवे तसेच अन्य सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
