रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत धान्याचा लाभ घेत असलेल्या सर्व...

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत धान्याचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! ‼️

आता अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी घरबसल्या काही मिनिटांतच स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात – तेही मोबाईल 📱 वापरून आणि चेहराव्दारे पडताळणी 🤳 करून!

राज्य शासनाने NIC च्या सहकार्याने सुरू केलेल्या Mera E-KYC या विशेष ॲपद्वारे लाभार्थ्यांना रेशन दुकानावर न जाता घरीच ई-केवायसी करता येते.

✨ मुख्य वैशिष्ट्ये:
✅ मोबाईलद्वारे 📱 घरबसल्या केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध!
✅ चेहराव्दारे त्वरित पडताळणी (Face Authentication) 🤳
✅ लाभार्थी स्वतः, दुकानदार किंवा घरातील सदस्य केवायसी करू शकतो.
✅ आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे.

🛠️ ई-केवायसी प्रक्रिया (Step-by-Step मार्गदर्शन):

1️⃣ ही दोन ॲप्स आधी डाउनलोड करा:
🔗 Mera E-KYC App👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth
🔗 Aadhaar Face RD App👇
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd

2️⃣ दोन्ही ॲप्स इन्स्टॉल करून आवश्यक परवानग्या द्याव्यात.

3️⃣ Mera E-KYC ॲप उघडा:
▪️ राज्य: महाराष्ट्र निवडा
▪️ आधार क्रमांक टाका
▪️ OTP टाका (आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर येईल)
▪️ Captcha भरा

4️⃣ चेहराव्दारे पडताळणी 🤳:
▪️ समोरचा कॅमेरा वापरून चेहरा स्कॅन करा
▪️ दुसऱ्याचे केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा
▪️ स्क्रीनवरील सूचनांप्रमाणे डोळ्यांची उघडझाप करा

5️⃣ चेहऱ्याच्या यशस्वी पडताळणीनंतर:
📟 लाभार्थ्याची माहिती रेशन दुकानातील E-PoS मशीनवर दिसू लागेल
📱 “E-KYC Status” मध्ये “Y” असल्यास प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

📢 विशेष सूचना – रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांसाठी:
🔹 आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 3 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे.
🔹 31 जुलै पूर्वी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही.
🔹 ज्यांना मोबाईलवरून ई-केवायसी करता येत नसेल त्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन 📟 E-PoS मशीनवरून केवायसी पूर्ण करावी.
🔹 रत्नागिरी जिल्ह्याबाहेर🚶‍♂️पण महाराष्ट्रातच इतर जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेले लाभार्थी देखील तेथील जवळच्या स्थानिक रेशन दुकानात जाऊन आपली केवायसी करू शकतात.
🔹 मुंबईत, ठाणे, पुणे व इतर शहरात असलेले🚶‍♂️लाभार्थी देखील मोबाईलवरून किंवा जवळच्या शिधावाटप / रास्त भाव दुकानात जाऊन स्वतःची ई-केवायसी सहज पूर्ण करू शकतात.

👶 पाच वर्षांखालील व पाच वर्षानंतरच्या मुलांसाठी सूचना:
🔸 सध्या 5 वर्षांखालील बालकांची ई-केवायसी आवश्यक नाही.
🔸 मात्र जेव्हा मूल 5 वर्ष पूर्ण करेल, तेव्हा:
▪️ त्याचे आधार कार्ड अपडेट करावे
▪️ त्यावर मोबाईल नंबर लिंक करावा
▪️ त्यानंतरच त्या मुलाची ई-केवायसी Mera E-KYC App वापरून फेस ऑथेंटिकेशन 🤳 द्वारे पूर्ण करणे अनिवार्य आहे.

🔁 इतर राज्यात स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी:
🔹 महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असलेल्या लाभार्थ्यांनी स्थानिक रेशन दुकानातील 📟 E-PoS मशीनवर “IMPDS KYC” पर्याय वापरून केवायसी पूर्ण करावी.
🔹 महाराष्ट्राबाहेरील लाभार्थ्यांनी देखील Mera E-KYC ॲपमध्ये स्वतः ज्या राज्यात वास्तव्यास आहेत (उदा. मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा इत्यादी) ते राज्य सिलेक्ट करून आधार क्रमांक टाकल्यास मोबाईलद्वारेच फेस ऑथेंटिकेशन करून ई-केवायसी पूर्ण करता येते.

👤✅ अन्नधान्याचा लाभ चालू राहणेकामी 100% लाभार्थ्यांची E-KYC आवश्यक आहे.🆔🧾📲

🔴 * सप्टेंबर 2025 चे धान्यासाठी ज्या लाभार्थ्यांची eKYC पूर्ण नसेल, त्यांना ❌ No eKYC; No Ration या तत्त्वानुसार धान्य मिळण्यात अडचण येऊ शकते.”* 🛑

👥 जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना मार्गदर्शन करून शक्य तेवढ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये.

📢 ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, गावातील इतर लाभार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवा – जेणेकरून कुणीही आपल्या हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही.

🌾 शाश्वत अन्नपूर्णतेकडून सर्वस्पर्शी अन्नशाश्वततेकडे!🌾
रोहिणी रजपूत, (प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी)

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...