रत्नागिरीरत्नागिरी नगरपरिषदेत मनसेचा धडक मोर्चा. गैरकारभाराची वरात नगरापरिषदेच्या दारात असा एल्गारमहिलांची लक्षणीय...

रत्नागिरी नगरपरिषदेत मनसेचा धडक मोर्चा. गैरकारभाराची वरात नगरापरिषदेच्या दारात असा एल्गारमहिलांची लक्षणीय उपस्थिती

रत्नागिरी नगरपरिषदेत अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणी विविध जनहितार्थ मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत रत्नागिरी नगरपरिषदे वर भव्य मोर्चा काढला.
“अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपरिषदेच्या दारात” अशा गगन भेदी घोषणानी रत्नागिरी शहर दुमदुमून गेले.

रत्नागिरी मधील जयस्तंभ येथून मोर्चाला सुरुवात झाली. मनसेचे महिला पदाधिकारी आणी कार्यकर्ते मोठया संखेने सहभागी झाले होते. त्यांच्या हातात विविध मागण्याचे फलक होते आणी ते जोरदार घोषणाबाजी करत नगरपरिषदे कडे मार्गक्रमण करीत होते.
मनसेच्या मागण्यामध्ये महिलांना मोफत स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे संडापाण्यामुळे होणारे समुद्र प्रदूषण तत्काळ थांबवणे घनकचरा प्रकल्प सुरु करणे शहरातील अंतर्गत खराब रस्ते दुरुस्ती न करणे गटारांची दुरावस्था फुटपाथ वरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण उनाड गुरे न प शाळांची दुरावस्था मारुती मंदिर सर्कल मधील पुतळ्यांचे ऑडिट करणे शहरातील झाडांची होणारी कत्तल खाजगी विकासक आणी अधिकारी यांचे संगनमत आणी त्यातून होणारे भूखंडाचे भ्रष्टाचार आठवडा बाजार मधील डी जे स्कवेअर यां आरक्षित भूखंडवरील जास्तीचे बांधकाम आणी त्यातील घोटाळा कोकणनगर स्मशानभूमी मधील विद्युत दाहिनी वरील देखभाल खर्च व पेठकिल्ला मधील बुरुजवर अनधिकृत बांधकाम यां गोष्टी करिता भव्य मोर्चा चे आयोजन केले होते.
मुख्याधिकारी बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होते ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेत सर्व मोर्चे करानी नगरपरिषद आवार मध्ये घेराव घालून घोषणाबाजी सुरु ठेवली.
शेवटी मुख्याधिकारी स्वतः आले त्यांना जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर अरविंद मालाडकर यांनी मागण्या काय आहेत याची माहिती दिली. आगामी पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास याही पेक्षा जहाल आंदोलन करावे लागेल असा इशारा देऊन व शेवटी अहमदाबाद विमान अपघात मधील मृतात्म्यास श्रद्धांजली वाहून आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माणसेच्या यां मोर्चा मुळे रत्नागिरी नगरपरिषदेच्या कामाकजावर आणी अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात ही असेच तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे कडून देण्यात आला. यावेळी अविनाश सौन्दळकर अरविंद मालाडकर सचिन शिंदे महेंद्र गुळेकर बाबय भाटकर रुपेश चव्हाण गौरव चव्हाण शैलेश मुकादम सुश्मिता सुर्वे संपदा राणा गीता गोसावी काजल गोसावी सरदार गोसावी इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Breaking News

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस15 जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस धावणार….

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या...