रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत नागरिक झाले मोठ्या प्रमाणात सहभागी–
👉भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज 14 आगस्ट रोजी सकाळी ठिक दहा वाजता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथून पालकमंत्री डॉ उदय सामंत. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत.जिल्हाधिकारी मनुज जिंदल.पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत रत्नागिरीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..
रत्नागिरी वासियांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद देत रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते..
