राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान गणपतीपुळे येथे आयोजित अल्ट्रा मॅरेथॉन कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या*.
अशा कार्यक्रमांमुळे केवळ आरोग्याचा संदेशच नव्हे, तर समाजात एकजुटीचा आदर्शही निर्माण होतो. शारीरिक व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे, असे यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, प्रांताधिकारी जीवन देसाई, अॅड. सचिन नाचणकर यांसह मोठ्या संख्येने धावपटू आणि रत्नागिरीकर उपस्थित होते.
