महाराष्ट्रविरोधी पक्षनेत्या शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अखेर सूप वाजले-

विरोधी पक्षनेत्या शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अखेर सूप वाजले-

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे अखेर सूप वाजले. दोन्ही सभागृहांत संविधानावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. या अधिवेशनात जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा घेण्यात आली. आता विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार ३० जून २०२५ रोजी होणार आहे.
दरम्यान, या अधिवेशनात लाडक्या बहि‍णींच्या अनुदानाची रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० संपवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत भारताचं संविधान कोणीही बदलू शकत नाही.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत बोलताना दिशा सालियन प्रकरणाची चौकशी एसआयटीने क्लोज केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिशा सालियान यांच्या वडिलांनी पोलिसांकडे काही तक्रार दिली असेल. त्यांच्याकडे यासंबंधीची अधिकची माहिती दिली असेल. त्यांनी काही संशय व्यक्त केला असेल, तर त्या सगळ्याचा अहवाल पोलिसांकडून अहवाल मागवला जाईल आणि ही माहिती एसआयटी चौकशीच्या माध्यमातून न्यायालयासमोर आणली जाईल, असेही शंभूराज देसाई यासंबंधी बोलताना म्हणाले.

Breaking News

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस15 जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस धावणार….

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या...

🌾गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलीजगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांची भेट

▪️देहदान उपक्रमाचे केले कौतुक पणजी, दि. १२: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ....