सिंधुदुर्ग ..आजच्या महाराष्ट्र दिनाचे आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेच्या दिवसाचे औचित्य साधत आजपासून जिल्ह्याच्या कारभारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए -आय )वापर करण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे मत्स्यविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
प्रशासकीय कारभारात ‘ए-आय’ चा वापर करणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील शरद कृषी भवनात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांच्या उपस्थितीत राणे यांनी ही महत्वापूर्ण घोषणा केली.
सद्याच्या बदलत्या युगात
‘ए-आय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिल्ह्यात पारदर्शक, गतिमान आणि भ्रस्टाचारमुक्त कारभार केला जाईल अशी ग्वाही राणे यांनी यावेळी सिंधुदुर्ग वासियांना दिली.
जगात प्रत्येक देशाचा विकास हा गतीने होत आहे. सिंधुदुर्गचा गतिमान विकास होण्यासाठी प्रत्येकाने ‘सिंधुदुर्ग फस्ट ‘हा विधायक दृष्टिकोन ठेवून शासन व प्रशासन यांच्या खांद्याला खांदा लावून काम करूया आणि जिल्हा सक्षम करूया असं कळकळीचं आवाहन राणे यांनी यावेळी केलं.
