Home रत्नागिरी ५१ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

५१ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

0
५१ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

रत्नागिरीच्या मुलींच्या जळगाव संघावर मात

अहिल्यानगर (क्री. प्र.) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या साखळी सामन्यांत रत्नागिरीच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत जळगाव संघावर मात केली.
बुऱ्हाणनगर येथील अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठाण, विश्वंभरा प्रतिष्ठाण व बाणेश्वर क्रीडा मंडळ बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत २४ जिल्ह्यांतील मुला-मुलींचे संघ सहभागासाठी उपस्थित असून ४ ते ७ डिसेंबरपर्यंत सामने रंगणार आहेत. मुलींच्या गटात रत्नागिरी संघाने साजेसा खेळ करीत जळगाव संघावर १ डाव ९ गुणांनी (१६-७) विजय मिळवला. पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर हा सामना रत्नागिरीने सहज खिशात घातला. यामध्ये मृण्मयी नागवेकर ३ मिनीटे संरक्षण, रिध्दी चव्हाण २.३० मिनिटे संरक्षण, आर्या डोर्लेकरने २.३० मिनिटे संरक्षण, दिव्या सनगले २ मिनिटे संरक्षण खेळ केला.
या स्पर्धेतील अन्य सामन्यांचे निकाळ पुढील प्रमाणे ः बलाढ्य धाराशीवने परभणीवर १ डाव ३ गुणांनी विजय संपादन केला. धाराशिव संघाकडून मैथिलीने ४ मिनिट १० सेकंद संरक्षण केले. सांगलीने बीडवर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. सांगली संघाकडून स्वप्नाली तामखडे आणि श्रेया तामखडे यांनी प्रत्येकी ३ मिनिट संरक्षण केले. सोलापूरने लातूरवर १ डाव ९ गुण राखत विजय मिळवला. सोलापूर कडून समृद्धी सुरवसेने नाबाद तीन मिनिट 20 सेकंद पळतीचा खेळ केला तर कल्याणी लांबकाणेने ४ मिनिट ४० सेकंद पळतीचा खेळ करून आक्रमणात ४ गडी बाद केले. ठाणे संघाने सिंधुदुर्गवर २४ गुणांनी विजय संपादन केला. ठाणे संघाकडून दीक्षा काटेकर हे ३ मिनिट 20 सेकंद तर प्रणिती जगदाळे यांनी ३ मिनिट संरक्षण केले. अक्षरा भोसलेने आक्रमणामध्ये ७ गडी बाद केले. मुंबई उपनगर संघाने नांदेड वर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. उपनगर संघाकडून दिव्या चव्हाणने ३ मिनिटे तर दिव्या गायकवाड ने ४ मिनिट १० सेकंद पळतीचा खेळ केला. तर रत्नागिरीने जळगाव संघावर १ डाव ९ गुणांनी (१६-७) मोठा विजय मिळवला. पहिल्या दिवशी झालेल्या किशोरांच्या (मुलांच्या) गटातील सामन्यात धाराशिवने १ डाव ६ गुणांनी पालघरवर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात सांगली संघाने छत्रपती संभाजी नगरचा १ डाव ६ गुणांनी पराभव केला. सोलापूरने सिंधुदुर्गवर १ डाव 21 गुणांनी विजय संपादन केला. पुणे संघाने लातूरचा १ डाव 16 गुणांनी पराभव केला. यजमान अहिल्यानगर संघाने परभणीवर १ डाव ९ गुणांनी विजय मिळवला. तर बलाढ्य ठाणे संघाने हिंगोलीवर १ डाव 18 गुणांनी मात केली. नाशिकच्या संघाने जळगाव वर १ डाव ९ गुणांनी विजय मिळवला.


रत्नागिरीचे संघ असे ः

  • मुली संघ ः दिव्या पालये (कर्णधार), वैष्णवी फुटक, रिद्धी चव्हाण, सान्वी सुर्वे, मृण्मयी नागवेकर, अस्मी कर्लेकर, सायली कर्लेकर, श्रावणी सनगरे, आर्या डोर्लेकर, तन्वी खानविलकर, साक्षी लिंगायत, स्वरांजली कर्लेकर (रत्नागिरी), दिव्या सनगेले (संगमेश्वर), दीक्षा मांडवकर (लांजा), दीक्षा गोतावडे (राजापूर). प्रशिक्षक – ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार (रत्नागिरी).
  • कुमार संघ ः विराज निवते, सार्थक कदम (चिपळूण), आर्यन बालदे, आशिष बालदे, पार्थ बुदर, अथर्व गराटे (संगमेश्वर), शुभम सुवरे, साहिश भलबले, ओमकार बेहरे, मयूर मासये, आराध्य मटकर, अरमान वळंजू, निखिल माळी, राज पळसमकर (राजापूर), विनायक पालये, लांजा. प्रशिक्षक – सिद्धांत कानडे (लांजा), किरण भोसले (राजापूर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here