रत्नागिरी शहरा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारवांचीवाडी येथे काल सकाळी गव्याचे दर्शन झाले असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे..
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात दिवसा व रात्री बिबट्याचे दर्शन होत असतानाच आता गव्हा रेड्याचे पण दर्शन झाले असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.. वन विभागाच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी खुलेआम पणे जंगलतोड सुरू असल्यानेच जंगलातील विविध प्राणी लोकवस्ती कडे येऊ लागले आहेत.. वन विभाग वेळीच जागा झाली नाही तर बिबट्या सह अनेक प्राणी मानवी वस्तीत येऊ शकतील असे बोलले जात आहे ..
