रत्नागिरी चे जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी रत्नागिरी विमानतळाचे बांधकाम आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाची लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किरण सामंत यांच्या समवेत पाहणी केली. या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.. रत्नागिरी येथुन लवकरात लवकर विमान सेवा सुरू व्हावी म्हणून ए.टी.सी ईमारतीचे काम व अन्य कामे वेगाने सुरू आहेत. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी तर एप्रिल किंवा मे 2026 पासून रत्नागिरी मुंबई रत्नागिरी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.आणी याच पार्श्वभूमीवर आमदार किरण उर्फ भैय्या सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी विमान तळाची पाहणी केली..
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
