रत्नागिरीकवी केशवसुतांची जन्मभूमीतील आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं. १ च्या अमृत...

कवी केशवसुतांची जन्मभूमीतील आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं. १ च्या अमृत महोत्सव सांगता समारंभाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला

कवी केशवसुतांची जन्मभूमीतील आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं. १ च्या अमृत महोत्सव सांगता समारंभाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला.

यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मालगुंडच्या संस्कारक्षम भूमीत आदर्श जीवन शिक्षण शाळेने ७५ वर्षे ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली आहे. ही शाळा सुसंस्कृत पिढी घडवणारे केंद्र आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात या शाळेचा मोठा वाटा आहे. शाळेच्या प्रगतीसाठी आणि आधुनिक सुविधांसाठी शासकीय स्तरावरून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या सोहळ्याला स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी. विद्यार्थी – विद्यार्थिनी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

Breaking News