रत्नागिरीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यानाचे भूमिपूजन पुण्यातील गुजर-निंबाळकरवाडी येथे राज्याचे उद्योग...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यानाचे भूमिपूजन पुण्यातील गुजर-निंबाळकरवाडी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते झाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यानाचे भूमिपूजन पुण्यातील गुजर-निंबाळकरवाडी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते झाले.

आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्य, भारत देश नाही तर जगाला कळावे हा संकल्प घेऊन हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे याचा आनंद आहे, असे ना. उदय सामंत ह्यांनी नमूद केले.
दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. सांस्कृतिक, साहित्याची ऊर्जा आम्हाला मिळाली. सरहद संस्थेचे संजयजी नहार यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारत आहेत. संजयजी नहार यांच्या संकल्पनेतून अनेक समाजउपयोगी संकल्पना उदयास आल्या व समाजाला त्यातून नवी दिशा मिळाली आहे. साहित्याच्या क्षेत्रात कामं करणारे दर्दी लोक आज अतिशय उत्तम पद्धतीने देशातील पहिले साहित्याचे दालन खुलं करत आहेत.

मराठी भाषेच जतन झाले पाहिजे, प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे आणि संवर्धन झाले पाहिजे अशा अनेक गोष्टी अशा कार्यक्रमांतुन साकार होतात म्हणून असे कार्यक्रम झाले पाहिजेत असे आवाहन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले. मराठी भाषेचा मंत्री म्हणून या कार्यक्रमांतून मला मराठी भाषेचे जतन, प्रचार, प्रसार, संवर्धन करणारे दर्दी साहित्यिक व प्रेक्षक भेटतात. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याच्यामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा सिंहाचा वाटा आहे. 750 वर्षांपूर्वीच्या या ग्रंथाचा संदर्भ घेऊनच हा दर्जा बहाल केला गेला याचा आम्हाला अभिमान आहे असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी सांगितले. मराठी भाषेचे इंग्रजी भाषेला पर्यायी शब्द निर्माण करण्यासाठी मोहीम उघडावी अशी विनंती मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी केली.

यावेळी संजयजी नहार, मिलिंदजी जोशी, संजयजी पगारिया, प्रमोद नाना भानगिरे, अनुजजी नहार, यशपालजी व सर्व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 17/06/2025

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक - 17/06/2025 १) मंडणगड - 25.50 मिमी२)...