महाराष्ट्रआज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉ....

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉ. उदय सामंत ह्यांनी किल्ले पुरंदर येथे उपस्थित राहून महापराक्रमी, धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉ. उदय सामंत ह्यांनी किल्ले पुरंदर येथे उपस्थित राहून महापराक्रमी, धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढून प्राणाची आहुती देणाऱ्या या पराक्रमी योद्ध्याच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तेजस्वी स्मृतीस ना. उदय सामंत ह्यांनी अभिवादन केले.

धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान यांची साक्षात मूर्ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अफाट बुद्धिमत्ता, अचाट नेतृत्वगुण आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याची प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व आजही आमच्या हृदयात जागृत आहे. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे, धर्म आणि राष्ट्रासाठी बलिदान स्वेच्छेने पत्करणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे यावेळी बोलताना ना. उदय सामंत ह्यांनी म्हटले.

यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री आशिषजी शेलार, पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे व मोठ्या संख्येने शिवप्रेमी व शंभूप्रेमी मावळे उपस्थित होते.

Breaking News

सावर्डे विद्यालयाचा वृक्षारोपण उपक्रमएक झाड हजारो जीवांचे जीवन – राजेंद्र वारे

सावर्डे - वृक्षारोपण म्हणजे निसर्गाशी मैत्री करण्याचा सर्वोत्तम मार्ग...

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे वेळापत्रक बदलले, गाड्यांचा वेग ही करण्यात आला कमी…

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे वेळापत्रक बदलले, गाड्यांचा वेग...