रत्नागिरीगणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.गणपती गेले गावाला. चैन पडेना आम्हाला...

गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.गणपती गेले गावाला. चैन पडेना आम्हाला च्या जयघोषात रत्नागिरी सह जिल्ह्यात दहा दिवसीय बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला

रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पांना निरोप देण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान रत्नागिरी चिपळूण खेड दापोली राजापूर गुहागर आदी ठिकाणी लाडक्या बाप्पाला वाजतगाजत भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला…

मांडवी भाट्ये शिरगाव येथील समुद्रकिनारी तर तालुक्याच्या ठिकाणी नदीकाठी गणेश विसर्जन करण्यासाठी मोठी गर्दी दिसुन आली..आज दहा दिवसीय गणेश उत्सवाची शांततेत सांगता झाली असली तरी उद्या रविवारी सायंकाळी मारुती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा आणि आठडा बाजार येथील रत्नागिरी चा राजा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे….दहा दिवसीय गणेश उत्सवाची सांगता झाली असल्याने गावी आलेल्या कोकण वासीयांनी पुन्हा मुंबई कडे जाण्यासाठी कोकण रेल्वे आणि एस.टी ला गर्दी केली आहे..

Breaking News