रत्नागिरी : गेले दोन ते तीन दिवस हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला यल्लो अलर्ट दिला असून रत्नागिरी शहरात गुरुवारी पहाटे तीन वाजण्याचा सुमारास अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे रत्नागिरीतील बळीराजा आता चिंतेत असून या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार पण मोठा चिंतेत सापडला आहे. गुरुवारी पहाटे विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली होती. राजापूर तालुक्यातील आडीवरे या गावात सुद्धा पावसाने गुरुवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली असून रत्नागिरी शहरात पडणाऱ्या पावसामुळे विद्युत पुरवठा सुद्धा काही काळापूर्ती खंडित करण्यात आला होता. तसेच या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना गर्मीच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान रत्नागिरी सह संगमेश्वर. साखरपा.देवरुख राजापुर आदी ठिकाणी ही जोरदार पाऊस पडला असल्याचे सांगण्यात आले
गुरुवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची रत्नागिरी शहरा सह परिसरात जोरदार हजेरी…..
