रत्नागिरी, (जिमाका) : ज्या विभागाकडे प्रलंबित अर्ज आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिन झाला. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागील प्रलंबित अर्जांचाही आढावा घेतला. आज नव्याने 5 अर्ज दाखल झाले आहेत. संबंधित विभागाने मागील प्रलंबित अर्जांसह याची निर्गती करावी.
