रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशपूर्ती सोहळा रॅली” संपन्न.
“बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ” या भारत सरकार च्या उपक्रमाला दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली असल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काल ०६/०३/२०२५ रोजी सायंकाळी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महिला व मुलींसाठी “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशपूर्ती सोहळा व रॅली” चे आयोजन करण्यात आले होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे यांच्या शुभ हस्ते या दशपूर्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड, पोलीस अधिकारी व अंमलदार, श्री. श्रीकांत हावळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी, श्री. अनिल माळी परिवीक्षा अधिकारी, श्रीमती. अश्विनी तांबडे, संरक्षण अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षका श्रीमती. कल्पना आंबवले, श्रीमती. साधना पागी, श्रीमती. प्रज्ञा खांडेकर व कर्मचारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी व मुलींनी या दशपूर्ती रॅली मध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला.
या (दुचाकी) रॅलीचा प्रारंभ: पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथून होऊन -> जेल नाका -> माळ नाका – > जेल नाका -> भाटये बीच -> जयस्तंभ -> रहाट घर -> नाईक फॅक्टरी -> पेठ किल्ला व परत -> पोलीस कवायत मैदान येथे येऊन शेवट झाला.