महाराष्ट्रमेरा भारत महान-- Airstrike in Pakistan: आरंभ है प्रचंड!

मेरा भारत महान– Airstrike in Pakistan: आरंभ है प्रचंड!

हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरला, नियंत्रण रेषेवर उघडला तोफखाना, Army कडून चोख प्रत्युत्तर. पुन्हा एकदा भारताने दहशत वादाविरोधातील आपली निती स्पष्ट करत, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या गुप्त ऑपरेशन अंतर्गत भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.

 हल्ले रात्री 1:30 वाजता करण्यात आले आणि यामागचा उद्देश होता, दहशतवाद्यांचे लॉंचपॅड्स आणि शस्त्रास्त्र साठ्याच नाश करणे
बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमध्ये मोठा हल्ला
सूत्रांच्या माहितीनुसार, मिराज-2000 आणि सुखोई-30 एमकेआय सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथील टार्गेट्सवर अचूक हल्ले केले. हे भाग जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांचे बालेकिल्ले मानले जात होते.
पाकिस्तानचा प्रतिउत्तर म्हणून एलओसीवर तोफखाना उघडला
भारतीय कारवाईनंतर पाकिस्ताननेही युद्धविरामाचा भंग करत पुंछ-राजौरी सेक्टरमधील भींबर गली भागात तोफेचा मारा केला. मात्र भारतीय लष्कराने संतुलित व चोख प्रत्युत्तर दिले असून, नियंत्रण रेषेवर सुरक्षेसाठी सगळी तयारी पूर्ण असल्याचे सैनिकी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
भारताची वायुसेना सज्ज
रक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत-पाकिस्तान सीमेवरील सर्व वायु संरक्षण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी तातडीने प्रत्युत्तर देता येईल अशी तयारी करण्यात आली आहे.

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...