बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर दिसून येत असून समुद्रही खवळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने देवगड .जयगड व मिरकरवाडा बंदरात शेकडो नौका सुरक्षित ठिकाणी दाखल झाल्या आहेत. समुद्रातील मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र (Arabian Sea) या दोन्ही समुद्र सध्या खवलेले असून याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी देवगड.जयगड व मिरकरवाडा बंदरात सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.
मोंथा चक्री वादळामुळे कोकणातील समुद्र खवळला, उरण मधील बोट समुद्रात भरकटली.अनेक मच्छीमार नौका बंदरात दाखल
