रत्नागिरीशिवरात्रीनिमित्त पतितपावन मंदिरात भागोजीशेठ कीर यांच्या वंशजानी भजनी बुवांचे केले स्वागत :

शिवरात्रीनिमित्त पतितपावन मंदिरात भागोजीशेठ कीर यांच्या वंशजानी भजनी बुवांचे केले स्वागत :

२४ फेब्रुवारी १९३१ रोजी दानशूर श्रीमान भागीजीशेठ कीर यांनी स्वा. वीर सावरकर यांच्या विनंती वरुन देशातील पहिले पतितपावन मंदिर भागेश्वराच्या कृपेने स्वखर्चाने बांधून हिंदू धर्मातील सर्व समाजांना खुले केले होते. त्याकाळी मोठं मोठी संस्थाने सुद्धा अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देऊ शकली नव्हती. भागोजीशेठ कीर यांनी त्यापूर्वी १८९९ साली किल्ल्यामध्ये भागेश्वर मंदिर बांधून भक्तांना खुले केले होते. भागोजी शेठ कीर यांनी बिकानेर पासून गोकर्ण महाबळेश्वर पर्यंत मंदिरे, शाळा, गोशाळा, महिला विदयालय, धर्माशाळा, अनाथाश्रम, पाणवठे, विहिरी, स्मशानभूमी स्वखर्चाने बांधून लोकसेवेसाठी अर्पण केली.


भागेश्वराचा भागोजी शेठ कीर यांच्यावर वरदहस्त होता, आपल्याला जे काही मिळाले आहे ते भागेश्वराच्या कृपेने मिळालेले आहे आणि मिळालेले आपले नसून गोरगरिबांचे आहे अशी शेठजींची धारणा होती. त्यांनी स्व कष्टाने कमावलेली निम्म्यापेक्षा अधिक कमाई मानवतेसाठी खर्च केली. दादर मुंबई येथे सरकारला दान केलेल्या भागोजीशेठ कीर हिंदू स्मशानभूमीच्या जागेची आजची किंमत पाच हजार कोटी पेक्षा अधिक आहे. असा दानशूर आजतगायत निर्माण झाला नाही. त्यांनी निर्माण केलेल्या सर्व वास्तूमध्ये हिंदू धार्मियांना प्रवेश खुला आहे असे असताना एप्रिल महिन्याच्या शिवरात्रीला पतितपावन मंदिरात भजनासाठी गेलेल्या वयोवृद्ध भजनीबुवांना तेथील व्यवस्थापकाने मंदिर प्रवेश नाकारून भजनाला मज्जाव केला. हे मंदिर आमचे आहे, या ठिकाणी तुम्ही भजन करू नका दुसऱ्या कोणत्याही देवळात जाऊन भजन करा. तसेच टाळ नाल वाजवून भजन करून देवाची भक्ती करता येते का? असे बोलून भजनी भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. यावर मोठा गदारोळ उठला होता, नागरिकांमधून संतप्त भावना आल्या. याचा निषेध म्हणून पतितपावन मंदिरातून भजनी बुवांनी भजन दिंडी आयोजीत करून हिंदू धर्मद्वे्षी व्यवस्थपकाचा निषेध नोंदविला यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती याच पार्श्वभूमीवर आज शिवरात्री निमित्ताने भजनीबुवा भजन करण्यासाठी पतितपावन मंदिरात आले असता भागोजीशेठ किरांच्या वंशजानी भजनी बुवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी संजय बुवा मेस्त्री, प्रकाश सुतार, संजय घाटविलकर, सोहंम धर्मे, मिरजुळकर बुवा, विकासबुवा भाटकर,दिपक सुर्वे,सुरेंद्र घुडे, साईनाथ नागवेकर, मनोजबुवा भाटकर, सुदेश नागवेकर, आर के विलणकर, राजेंद्र बिर्जे, कौस्तुभ नागवेकर,रघुवीर शेलार, प्रकाश हातखंबकर, सत्यवती बोरकर, अस्मिता चवंडे, प्रेरणा विलणकर, अमृता मायनाक, आदिती शिरधनकर आदी उपस्थित होते. मोठा पाऊस असताना सुद्धा भजनी बुवांनी मोठया उत्साहात भजन कार्यक्रम संपन्न केला. देवळात आरती झाल्यानंतर नैवेद्यlच्या प्रसादाची व्यवस्था भाटये येथील मनोज बुवा भाटकर यांनी केली.

Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 17/06/2025

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक - 17/06/2025 १) मंडणगड - 25.50 मिमी२)...