रत्नागिरीहळदीच्या पिवळ्या रंगात रंगला साहित्याचा सुवास

हळदीच्या पिवळ्या रंगात रंगला साहित्याचा सुवास

हळदीच्या पिवळ्या रंगात रंगला साहित्याचा सुवास!

अदिती मयेकर यांच्या ‘काव्यादिती’ काव्यसंग्रहाचे भावस्पर्शी प्रकाशन

हर्चे (रत्नागिरी):

लग्नघराची लगबग, सनईचे सूर, नातेवाईकांची मांदियाळी आणि त्यातच अंगाला लागणारा हळदीचा पिवळा धमक रंग… अशा अत्यंत मंगल आणि भावूक वातावरणात एका आगळ्यावेगळ्या, अभूतपूर्व साहित्यिक सोहळ्याची भर पडली! ‘स्टेथोस्कोप’ पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक डॉ. अनिकेत मयेकर यांच्या भगिनी अदिती अंजनी आनंदकुमार मयेकर यांचा प्रथम काव्यसंग्रह ‘काव्यादिती… कविता डायरीतल्या’ याचा प्रकाशन सोहळा त्यांच्याच हळदीच्या शुभमुहूर्तावर अत्यंत अनोख्या पद्धतीने पार पडला. भाऊ डॉ. अनिकेत आणि मयेकर कुटुंबीयांनी अदितीला दिलेली ही ‘साहित्यिक भेट’ केवळ एक सरप्राईज नव्हती, तर कौटुंबिक प्रेम आणि साहित्याचा एक नितांत सुंदर संगम ठरली.

अदिती यांच्या विवाह सोहळ्यातील हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच, अचानक या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाची घोषणा झाली. अंगावर हळदीचा रंग आणि हातात स्वतःच्या अक्षरांचे हे देखणे रूप पाहून नववधू अदितीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. उपस्थित सर्वच नातेवाईक आणि ग्रामस्थ मयेकर कुटुंबीयांची ही अनोखी आणि सुसंस्कृत कल्पना पाहून थक्क झाले आणि संपूर्ण वातावरण एका वेगळ्याच आनंदाने आणि भावुकतेने भरून गेले.

‘काव्यादिती’ हा अदिती मयेकर यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून, याचे प्रकाशन सोनचाफा प्रकाशन स्नेहा सुतार , गोवा यांनी केले आहे. या संग्रहात अदिती यांच्या हृदयातील हळवे कोपरे, सुंदर स्वप्ने, नात्यांची विण आणि त्यांचे समृद्ध जीवनानुभव अतिशय तरल शब्दांत उमटले आहेत. आपल्या बहिणीच्या लेखनाला ‘सोनचाफा प्रकाशन’च्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळवून देत डॉ. अनिकेत यांनी भाऊ म्हणून एक आदर्श भेट दिली आहे.
या संपूर्ण कौटुंबिक आणि साहित्यिक सोहळ्याचे सुंदर सूत्रसंचालन प्राध्यापक यु. बी. पाटील सर यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत केले.तिच्या काकी डॉ स्मिता अविनाश मयेकर या सुद्धा होत्या.या प्रसंगी अदिती यांचे काका, काकी, मामा, सर्व भावंडे,कॉलेज चे प्राध्यापक,हर्चे गावचे ग्रामस्थ आणि दोन्ही बाजूंचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एका बाजूला लग्नाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला अदितीच्या या साहित्यिक कौतुकाचा सार्थ अभिमान स्पष्ट दिसत होता.

लग्न, हळदीचा उत्सव आणि पुस्तक प्रकाशन हा त्रिवेणी संगम साहित्याच्या इतिहासात आणि मयेकर कुटुंबीयांच्या आठवणीत सुवर्णअक्षरांनी कोरला गेला आहे. ‘काव्यादिती’ हा काव्यसंग्रह रसिकांच्या मनाला नक्कीच भुरळ पाडेल.

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...