रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समितांच्या निवडणुकी ची मतदान प्रक्रिया सकाळी ठिक 7.30 वाजता कडक पोलिस बंदोबस्तात सुरू झाली आहे.सकाळी सकाळी उत्साह कमी होता परंतु आता हळूहळू मतदार घराबाहेर पडून मतदान करू लागले असल्याने ग्रामीण भागातील विविध मतदान केंद्रावर गर्दी दिसू लागली आहे.. दुपारी बारा वाजेपर्यंत 22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान दुपारनंतर मतदानासाठी अधिक गर्दी होईल आणि सायंकाळ पर्यंत अंदाजे 55 ते 60 टक्के मतदान होईल असे बोलले जात आहे
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
