रत्नागिरी शहरातील काँग्रेस चे एक कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रत्नागिरी शहर काँग्रेस च्या अध्यक्षपदी निवड केली असल्याने त्यांच्या या निवडीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे… अश्फाक काद्री यांची निवड झाली असल्याचे समजता माजी आमदार हुस्नबानु खलीफे.वरिष्ठ नेते रमेश किर सह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थाने तळागाळात काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला हे पद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.अशफाक काद्री हे सुरवाती पासूनच काँग्रेसचे एक कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असत उशिरा का होईना आज त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने भविष्यात त्यांच्या समोर रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचे फार मोठे आव्हान समोर असणार आहे आणि या वेळी त्यांची कसोटी लागणार आहे.
रत्नागिरी शहर काँग्रेस च्या अध्यक्षपदी अश्फाक काद्री यांची करण्यात आली नियुक्ती.सच्या कार्यकर्तला न्याय मिळाला असल्याने अनेकांनी व्यक्त केले समाधान
