रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवारां विरोधात उघडपणे बंडखोरी करणाऱ्या परशुराम कदम यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी दिली आहे.. परशुराम कदम हे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.त्यांनी ही हातखंबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने त्यांच्या ऐवजी सुयोग कांबळे यांना उमेदवारी दिली.त्यामुळे परशुराम कदम नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत उघड पुणे बंडखोरी केली असल्याने शिवसेनेतुन त्यांना काढून टाकले जात आहे असे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी सांगितले आहे…