ग्रामपंचायत हे गावाच्या विकासाच दालन असून गावातील ग्रामस्थांच्या सोयीसुविधासाठी उत्तम प्रकारचे काम झाले पाहिजे. या नूतन इमारतीमधून पाटगाव गावातील ग्रामस्थांसाठी चांगल कामं व्हावे अशी अपेक्षा मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावाच्या सभागृहासाठी २० लाख मंजूर केले. तसेच भविष्यात पाटगाव गावच्या विकासासाठी कायम कटीबद्ध राहू अशी ग्वाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली.
यावेळी आमदार शेखरजी निकम, तहसीलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी भरत चोगले, रवींद्र, माने, राजेंद्र महाडिक, प्रमोद पवार, बंडयाशेठ बोरुकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.