पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे वेळापत्रक बदलले, गाड्यांचा वेग ही करण्यात आला कमी…
पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १५ जून पासून बदलले असून मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग ही कमी करतण्या आला आहे. बदलेल्या पावसाळी वेळा पत्रकाची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन जनसंपर्क अधिकारी सचीन देसाई यांनी केले आहे…
सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते. मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्व पावसाळी आणि इतर पायाभूत कामे पूर्ण केल्याने पावसाळी वेळापत्रकात सुधारणा केली आहे. यंदा १० जूनऐवजी १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तर, ३१ ऑक्टोबर ऐवजी २० ऑक्टोबर पर्यंतच पावसाळी वेळापत्रक लागू असणार आहे. त्यामुळे पावसाळी वेळा पत्रकाचा कालावधी १५ दिवसांनी कमी झाला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर पर्यंत ७३९ किमी पट्ट्यात कोकण रेल्चेचा विस्तार आहे. या मार्गात ७२ स्थानके आहेत. ८४.५० किमीचे ९१ बोगदे असून, ३७८ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग, ८७ समांतर रस्ता फाटक (Vere गेट) आहेत. तसेच कोकण रेल्वे मार्गात अनेक वळणे असून दरडप्रवण ठिकाणे आहेत. तसेच जोरदार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन रेल्वेगाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते. कोकण रेल्वेच्या एकूण ७३९ किमी मार्गापैकी वीर ते उडुपी या ६४६ किमी मार्गावर पावसाळ्यात वेगमर्यादा लागू असते. परिणामी रेल्वेगाड्या कूर्मगतीने धावतात.
कुठे, किती वेगमर्यादा
रोहा – वीर (४७ किमी) – सामान्य वेग ते ताशी १२० किमी
वीर – कणकवली (२६९ किमी) – ताशी १२० किमी ते ७५ किमी
कणकवली – उडुपी (३७७ किमी) – ताशी १२० किमी ते ९० किमी
उडुपी – ठोकूर (४७ किमी) – सामान्य वेग ते ताशी १२० किमी
यावेळी रेल्वेगाडीचा वेग ताशी ४०ते ५० किमी असेल
मुसळधार पाऊस कोसळू लागताच दृश्यमानता कमी होते. त्यामुळे रेल्वेमार्ग पटकन दृष्टीस पडत नाही. तसेच आपत्कालीन परिस्थिती असल्यास लक्षात येत नाही. त्या त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मुसळधार पाऊस कोसळत असताना रेल्वेचा वेग ताशी 40 किमी ठेवावा अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत…
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना.
पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू राहील.
प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट – NTES I.e. enquiry.indianrail.gov.in किंवा ऑल इंडिया रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर ट्रेनच्या वेळा तपासाव्यात.